Sunday, March 7, 2010

फर्ग्युसन रस्ता- हरवलेला रस्ता...

मी साधारण पहिल्या इयत्तेत असताना आम्ही कर्वेनगर मधून फर्ग्युसन महाविद्यालयातील सेवक वसाहतीत राहायला गेलो. कर्वेनगर मध्ये आम्ही ज्या चाळीत राहत होतो ती गल्ली नंबर आठ मधील माझिरे चाळ या फर्ग्युसन महाविद्यालयातील चाळीपेक्षा मोठी म्हणजे दुमजली होती आणि आजूबाजूलाही काही चाळी होत्या. फर्ग्युसनमध्ये मात्र आमच्या चाळीच्या मागे एक टेनीस कोर्ट होते आणि समोर काही बंगले होते. पण मला सर्वात जास्त आवडला तो फर्ग्युसन रस्ता. कर्वेनगर मधील आमच्या चाळी पर्यंत असलेला रस्ता हा कच्चा आणि कायम डबक्यानि भरलेला असे. तर हा फर्ग्युसन रस्ता मात्र कसा छान डांबरी दोन्ही बाजूंनी गर्द झाडी असलेला होता.

गरवारे पुलापासून सुरु होणारा हा रस्ता अगदी शेतकी महाविद्यालयापर्यंत पसरलेला आहे. आणि दोन्हीबाजुला असलेली झाडी त्याला विशेष रंगत आणायची. वड, पिंपळ, गुलमोहर,कडूनिंब, इत्यादी वृक्षांची इथे सावली होती. कधीही दुपारच्या उन्हात या रस्त्यावरून जाणारा माणूस थकत नसे कारण कितीही प्रखर उन असले तरी फर्ग्युसन रस्त्यावर मात्र शांत आणि शीतल सावली देणारी झाडे होती. यातील बऱ्याच वृक्षांनी सावली दिली होती ती मोठ मोठ्यांना. यात टिळक होते, आगरकर होते, नामजोशी होते, गोखले होते, चिपळूणकर होते...

अशा थोरा-मोठ्यांना ज्या वृक्षांनी सावली दिली त्या वृक्षांच्या सावलीतून चालणे हेही एक भाग्यच होते. या वृक्षांबरोबरच या रस्त्यावर दोन सुंदर मंदिरे आहेत एक संत तुकाराम महाराजांच आणि दुसर संत ज्ञानेश्वर महाराजांच. या मंदिरांमुळे या रस्त्याने अनेक पालखी सोहळे पहिले आहेत आणि मीही. ज्ञानबा-तुकाराम असं जयघोष करत जाणारे एवढा प्रचंड जनसमुदाय, त्यांच्याबरोबर असलेले घोडे, बैल, टाळ-मृदुंगाचा नाद ऐकून मंत्रमुग्ध व्हायला होत असे. आणि अभिमानही वाटत असे कि माझ्या घराच्या बाजूच्या रस्त्यावरून पालखी जाते. नुसती जातच नाही तर या मंदिरांसमोर विसावते. इथे या विसावलेल्या पालखीच्या दर्शनाला अनेक भाविक जमत आणि ते पालखीतील वारकरी समुदायाला फराळ देत. जशी गावाकडच्या लोकांना त्यांच्या गावातील जत्रेत मजा येते तशीच मजा मला या तास दोन तासाच्या जत्रेत येत असे. बीज काळातील सप्ताहात तुकाराम महाराज मंदिरात कीर्तनाची रेल चेल असे तीला लाउड स्पीकरची जोड नव्हती तरी आमच्या घरात कीर्तन ऐकू येई. आपोआप संस्कार मनावर घट्ट विणले जात त्यासाठी आम्हाला संस्कार वर्गात जावे लागत नव्हते.

रंगपंचमीला महाविद्यालयातील तरुण तरुणींची इथे झुंबड उडत असे. पूर्ण रस्त्यावर हि मंडळी रंग उधळत आनंदाने फिरत असत मग वेळ कोणतीही असो सकाळ, दुपार कि संध्याकाळ. ख्रिसमस, न्यू ईयर, या दिवशी सुद्धा हा रस्ता गजबजून जात असे. आताही गजबजलेला असतो पण पोलीस बंदोबस्तात.

त्याकाळी समृद्ध असलेल्या या रस्ता वर काही तुरळक दुकाने व हॉटेल्स सोडली तर बाकी काही नव्हते पण तरी तो नयनरम्य होता. आज त्याच रस्त्यावरून जायची इच्छा होत नाही, त्याची दुरवस्था पाहवत नाही. दोन्हीबाजूनि उभे असलेले मॉल्स, आणि महापालिकेने केलेले खड्डे, यातच कधीकाळी काळी वृक्षांच्या सावलीत रमलेला हा रस्ता आता हरवला आहे...

Life is all in the timing and spacing….

Everyone must have heard about “Animation is all in the timing and spacing” said by Richard Williams. But what is Animation? It is the Life to objects, characters, sketches, dots, pixels, lines, squares, rectangles, circles, etc etc etc. Then why why don’t we call it Life is all in the timing and spacing?

We all have friends and relatives. But when to contact them is the time set by god. We won’t send sms to our relative at 2.00 AM to just time pass, but we will send it to friend. And when it’s time to tell something from your heart you tell it to your nearest someone there comes a spacing, the space between the two hearts.

Timing and spacing are always related to each other in a complex way. While animating it’s the complex thing to understand but when you get over it then it’s a simplest method to animate. In life we also face such situations. A boy in college try to make zero distance with almost every pretty girl in college, he thinks “are yarr iske dil aur mere dil me jo spacing hai who kam ho jaye” but not a every guy has a good time with him and hence everyone dosent get those pretty girls.

To win the timing and spacing in animation techniques people like Walt Disney spent their Life’s and we are enjoying the fruit i.e. Principles of Animations. But to feed us this fruit Disney has gone through lots of troubles and hard work in his life. He spent lots of time on thinking on the various things he was observing and then he illustrated it on canvas. His canvas is film reel where he gathered all his time spent on observations and he just adjusted this time in spaces between the frames of film. He enjoyed success because he spent his Life in Time and Spacing………

Friday, February 26, 2010

दुरावलेली मैत्री...

बऱ्याचदा आपल्या जीवनात असं काही होत असतं कि आपल्यालाच कळत नसतं कि हे असं का घडलं. आपले काही मित्रं आपल्यापासून दुरावतात. काही छोटे गैरसमज असतात तर काही मोठे. पण शेवटी सगळे गैरसमजच असतात. आपण एकमेकांशी नं बोलल्याने गैरसमज वाढत जाऊन मैत्री तुटते.

माझेही असेच काही मित्रं आहेत जे दुरावले आहेत. त्यानंतर अजूनही आमच्यात सुसंवाद झालेला नाही. त्याचे कारण दोन्हीकडून तसा प्रयत्न कोणीच केला नाही. मीही समोरची व्यक्ती बोलेल किंवा समोरच्या व्यक्तीनेच सुरुवात करावी या अपेक्षेने बोललो नाही. आणि समोरच्या व्यक्तीनेही तोच विचार केला असावा. आणि आमच्यात सुसंवाद घडावा यासाठी इतरही कोणी प्रयत्न केले नाही.

खरतरं दुसऱ्या कोणी आमच्यात सुसंवाद व्हावा म्हणून प्रयत्न करण्यापेक्षा आम्हीच एकमेकांशी बोलून सगळे प्रश्न सुटले असते पण आमच्यातला अहंकार आडवा आला. माझ्यातला तर नक्कीच आला. मला सतत आसच वाटलं कि माझी काहीच चूक नाहीये मग मी का बोलू? पण माझ्या हे लक्षातच नाही आलं नाही कि आपली चूक नाहीये हे समोरच्याला कळण्यासाठी तरी आपल्याला त्याच्याशी बोलायला हवं. बोलण्याची गरज वाटत नाही त्या वेळेस मैत्री एकतर एकदम घट्ट झालेली असते किंवा तुटलेली असते.

आज मागे वळून बघताना खूप वाईट वाटत. कारण मी कायम मानत आलोय कि नातेवाईक असण्यापेक्षा मित्रं असणं अनेक पटींनी चांगलं. कारण मित्रं कायम भावनेने बांधलेले असतात तर नातेवाईक हे रक्ताने. आपण कोणाला मित्रं मानलं तर त्यामागे काही भावना असतात. आपण एकमेकांबरोबर काही जिव्हाळ्याचे, आनंदाचे क्षण घालवलेले असतात. काही दुःखे सांगितलेली असतात. हे मित्रं असतात तरी कोण? तर ते असतात आपले सहकारी. सहकारी मग कोणतेही असोत, शाळेतले, कॉलेजमधले, क्रिकेटच्या ग्राउंडवरचे, जिममधले किंवा ऑफिसमधले. अशा मित्रांपासून दुरावणं मनाला यातना देऊन जातं.
तुटलेली मैत्री जर मुलाशी असेल तर ती जोडताना फारसा प्रोब्लेम येत नाही आणि तसा माझा अनुभवपण आहे. त्याला आपण चार शिव्या देऊन बोलता करू शकतो. पण मैत्री जर एखादया मुलीशी तुटलेली असेल तर फार अवघड जातं. मला तर नक्कीच हे जगातलं सगळ्यात अवघड काम वाटतं. कारण मुलींशी मुळात बोलतानाच मी खूप संकोचून बोलत असतो. आणि समजा अश्या एखादया मुलीशी आपण बोलायला गेलो आणि तिचा गैरसमज झाला कि आपण तिच्यावर लाईन मारतोय तर काय करावं? एकवेळ तिला ते चांगलं वाटलं किंवा तिने ते लाईटली घेतलं तर ठीक पण जर तिला त्याचा रागच आला तर मग पुन्हा मैत्री होणेही दुरापास्त. आणि मुलींच्या बाबतीत नेमकं आसच होतं. वर परत ती हि गोष्ट स्वतापाशीच ठेवेल कि नाही हेही माहित नसतं. म्हणजे आधीच तिचा गैरसमज आणि तो ती सगळ्यांना सांगत सुटणार.

माझ्या लिस्टमध्ये मुलेहि आहेत आणि मुलीही. मुलांशी मी सुरुवात करून बघेनही पण मुलींच्या बाबतीत काय? असा हा मैत्रीचा यक्ष प्रश्न माझ्यासमोर उभा आहे. उत्तरं मलाच शोधावे लागेल पण माहित नाही कधी सापडेल.