Wednesday, November 20, 2019

Project Management : Part-05: Project Requirement


मित्रांनो समजा आपण एखादा मोठा ग्रुप घेऊन फिरायला निघालो आहोत. मग आपण काय करतो तर ज्या ठिकाणी जायचे आहे त्याठिकाणची सगळी माहिती नोंद करून ठेवतो. त्याचबरोबर प्रवासाला लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करणारी एक लिस्ट तयार करतो. या लिस्टमध्ये प्रवासाची तिकिटे, राहण्याच्या ठिकाणाचे बुकिंग केले असेल किंवा करायचे असेल तर त्याची नोंद, कधी, कोणत्या दिवशी, किती वाजता, कुठे जायचे, तिथे काय बघायचे, याची जुजबी नोंद. तसेच निघताना आपल्या ग्रुपमधील कोणती व्यक्ती कशी पोहोचेल आणि सगळ्यांचा एकच पिकअप पॉइंट कोणता असेल या सर्व गोष्टींची नोंद आपण करतोच. त्याचबरोबर आपण प्रवासामध्ये लागणाऱ्या महत्त्वाच्या सामानाची यादीदेखील करतो. जर आपण अशाप्रकारे कोणतीही तयारी न करता प्रवास सुरू केला तर आपल्याला काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

अगदी अशाच प्रकारे एखादे प्रोजेक्ट सुरू करताना त्या प्रोजेक्टमध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टींची यादी तयार करणे म्हणजे प्रोजेक्ट रिक्वायरमेंट.

आता हेच बघा ना एखादे प्रोजेक्ट सुरू करायचे असेल तर, क्लायंटला नक्की काय हवे आहे याच्या नोंदी करून घेणे, क्लायंट हे प्रोजेक्ट कोणासाठी करत आहे म्हणजे टारगेट ऑडियन्स कोण आहे याची नोंद करून घेणे, टारगेट ऑडियन्स च्या गरजा समजून घेणे आणि त्यांच्या नोंदी करणे, आपल्या प्रोजेक्टमधून आपल्याला काय साध्य करायचे आहे याची नोंद करणे म्हणजे आपल्या प्रोजेक्टचा गोल काय आहे हे नोंद करून ठेवणे, तसेच या रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारचे मनुष्यबळ लागेल त्यांची कुशलता काय असेल, त्यासाठी कोणत्या प्रकारचे हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर लागेल, ते कधी लागेल याच्या नोंदी करणे हे हितकारक असते यामुळे आपण प्रोजेक्टच्या मध्ये येणाऱ्या सर्व बाबींचा योग्य तो विचार करतो आणि त्याप्रमाणे तयार होऊनच आपल्या प्रोजेक्टच्या प्रवासाला सुरुवात करतो. 

Sunday, November 10, 2019

Project Management : Part-04: Cone of Uncertainty- Project Stakeholders

प्रोजेक्ट स्टेकहोल्डर्स म्हणजे प्रत्येक ज्यांना प्रोजेक्ट मध्ये कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे अशा व्यक्ती. कोणत्याही प्रोजेक्टमध्ये अशी अधिकारी व्यक्ती खूप महत्वाची असते. अशी व्यक्ती फक्त क्लाएंट असते असे नाही तर ती तुमच्या कंपनीची एखादी उच्च पदावरील व्यक्ती असेल अथवा प्रोजेक्ट साठी काम करणारी एखादी कन्सल्टन्ट अथवा अन्य कोणी. हि एक व्यक्ती किंवा अशा अनेक व्यक्ती तुम्ही संचालित करत असलेल्या प्रोजेक्ट संबंधित अनेक महत्वाचे निर्णय घेणार असते जसे कि;
१. रिक्वायरमेंट
२. टाइमलाईन
३. कामाचे स्वरूप
४. कॉस्ट
५. मनुष्यबळ
६. तुम्ही केलेले काम योग्य आहे कि अयोग्य

आता अशा अनेक व्यक्ती असतात तेव्हा "व्यक्ती तितक्या प्रवृत्ती" हा अनुभव तुम्ही घेऊ शकाल. या सर्व व्यक्ती आणि त्यांची मते जाणून घेऊन काम करणे हे जितके महत्वाचे तितकेच महत्वाचे कोणत्या व्यक्तीस कोणत्या प्रकारचा सर्वोच्च अधिकार आहे हे माहित करून घेणे.

समजा तुमच्या घरी पार्टी आहे आणि पाहुण्यांसाठी तुम्ही एखादा पदार्थ बनवला आणि तो घरातील ४ व्यक्तींना खायला दिला तर जशी तुम्हाला वेगवेगळी प्रतिक्रिया मिळेल जसे कि गोड पदार्थ असेल तर खूपच गोड आहे  (डाएट करणारी व्यक्ती ) किंवा थोडी साखर अजून हवी होती (डाएट न करणारी व्यक्ती ) अशा दोन विरुद्ध प्रतिक्रिया तुम्हाला मिळू शकतात. यातील कोणाची प्रतिक्रिया तुम्ही फायनल धराल? ज्या व्यक्तीला स्वयंपाकातील जास्त कळते तिला. बरोबर ना? अगदी तसेच हे आहे.


तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट नेहमी तयार राहील हे तुम्ही पाहिलं पाहिजे. कोणत्याही व्यक्तीने प्रोजेक्ट संदर्भात प्रश्न विचारला तर तुम्ही हा रिपोर्ट बघून लगेच उत्तर देऊ शकाल. प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी काही ऍप्लिकेशन्स तुम्ही वापरू शकता (Microsoft Project, Asana, Teamwork, ProofHub, Jira, Trello, etc)

प्रोजेक्टचे स्टेटस नेहमी अपडेट करा आणि सगळ्यांबरोबर विशिष्ठ कालावधीनंतर शेअर करीत रहा. तुम्ही स्वतः स्टेटस शेअर केल्याने तुम्हाला तुमची कार्यक्षमता वेगळी सिद्ध करण्याची गरज पडणार नाही. अशाप्रकारे तुम्ही प्रोजेक्टमध्ये काही संकटे आली तर आधीच त्यांचा प्रतिकार करण्यास सगळ्यांना बरोबर घेऊन मार्ग काढू शकाल. 

Monday, November 4, 2019

Project Management: Part-03: Uncertainty

मित्रांनो, कोणत्याही प्रोजेक्टच्या आधी त्या प्रोजेक्टबद्दल खूप कमी माहिती असते. म्हणजे;
१. प्रोजेक्ट स्टेकहोल्डर्स (Project Stakeholders)
२. प्रोजेक्ट रिक्वायरमेंट (Project Requirement)
३. प्रोजेक्ट टाइमलाईन (Project Timeline)
४. प्रोजेक्ट टीम (Project Team)
५. प्रोजेक्टमधील चॅलेंजेस (Challenges in Project)
६. प्रोजेक्टमधील चॅलेंजेसची सोल्युशन्स (Solutions of Challenges)

आता एवढ्या सगळ्या गोष्टी एकाच वेळी माहित होणं अवघड आहे. कधी प्रोजेक्ट संपत आल्यावर स्टेकहोल्डर्स नक्की कोण हे समजते तर कधी त्यांची संख्या जास्त असते. प्रत्येकाचे मन सांभाळणे अवघड गोष्ट आहे. कारण "मन" हे कोणत्याही तराजूमध्ये तोलता येत नाही कि अग्रीमेंटमध्ये बांधून ठेवता येत नाही.

सगळ्यात क्लिष्ट असते ते म्हणजे क्लिअर रिक्वायरमेंट प्राप्त होणे. अनेकदा क्लाएंटला काय हवे आहे हे त्यांना स्वतःलाच माहित नसते तर कधी ते आपल्याला नीट कळत नसते. यामध्ये महत्वाचे असते ते म्हणजे संवाद आणि संवादाची भाषा. भाषा म्हणजे इंग्रजी, फ्रेंच वगैरे नव्हे तर आपली तांत्रिक (technical) आणि त्यांची अतांत्रिक (non -technical).

टाइमलाईन तर अशी गोष्ट आहे जी क्लाएंट आणि आपली कधीच जुळत नसते. एखादे प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने चालू आहे असा अहवाल आपण दिला रे दिला कि क्लाएंट ते लवकर पूर्ण करायला सांगतो. एखादा प्रोजेक्ट काही अडचणीतून जात असेल तर क्लाएंट वेळेच्या बंधनाची आठवण करून देतो. एखाद्या प्रोजेक्ट मध्ये क्लाएंट कडून काही गोष्टींची पूर्तता व्हायची असेल तर टाइमलाईन बदलून वेळ वाढवून मिळतो. टाइमलाईन न जुळण्याची असंख्य करणे असतात.

प्रोजेक्ट टीम हा विषय नाजूक असतो. प्रोजेक्ट रिक्वायरमेंट नीट माहित नसल्यास टीम काय असायला पाहिजे हे ठरवता येत नाही. टीम काय हवी हे कळले तर ती उपलब्ध नसते. उपलब्ध असल्यास कोणाला सुट्टी हवी असते तर कोणाला ट्रेंनिंग. टाइमलाईन आणि टीमचे एक वेगळेच नाते असते. जो प्लॅन आपण टीमला विचारून करतो तो योग्य रीतीने पुढे न जाण्यास अनेक अचानक गोष्टी घडतात तर जो प्लॅन आपण स्वतः करतो त्यात अडचण काही असू, आपण तो न विचारता केला हे एकमेव कारण असते.

प्रोजेक्ट मधील चॅलेंजेस आणि त्यांची सोल्युशन्स हे आपण गृहीत धरल्यापेक्षा काहीतरी वेगळेच रसायन असते.
आणि या सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण स्वतः. आपण स्वतः च  जर नीट प्लॅन करून ते पूर्ण करून घेऊ शकत नसलो तर इतरांना दोष तो काय द्यायचा?

या सगळ्या माहित नसलेल्या किंवा कमी माहित असलेल्या गोष्टी म्हणजे अनसर्टनीटी (Uncertainty). 

Monday, October 28, 2019

Project Management: Part-02: Initial Preparation

आता तुमच्याकडील कोणत्याही एका प्रोजेक्ट चा विचार करा. जेवढा वेळ हे प्रोजेक्ट पूर्ण करायला लागेल तेवढी उत्कंठा वाढत जाते, खर्च वाढतो, प्लॅनचा अंदाज आणि सत्यता यातला फरक समजायला लागतो, आणि काही वेळा परिश्रम वाया जातात. यालाच 'कोन ऑफ अनसर्टनीटी' (Cone of Uncertainty) म्हणतात.

आता आपण आपल्या हत्तीचेच उदाहरण बघू. अक्खा हत्ती जर आपण मुठीत घ्यायचे  म्हणलो तर शक्य आहे का? नाही ना? मग तसाच अक्खा प्रोजेक्ट एकाच वेळी करायला गेलो तर काय होईल? मुळात आधी हत्तीचा आकार आणि मुठीचा आकार याचा मेळ बसणार नाही आणि नंतर उचलणे तर लांबच राहील.

आता आपण माकडांचे उदाहरण बघू, हि माकडं त्यांच्या आडदांडपणाने एखाद्या फळबागेत घुसतात प्रचंड हैदोस घालतात, फांद्या तोडतात, फळे तोडतात पाने फुले वेळी सगळे काही तोडतात. ती त्यांच्याच मस्तीत असतात. याने होते काय कि बागेचा मालक त्यांना हुसकावून लावतो. पोटात किती जाते?

या उलट पोपट, कोकीळ असे पक्षी फक्त खाण्यालायक फळे खातात. बागेचा मालक असे पक्षी आपल्या बागेत यावेत त्यांनी सुमधुर गुंजन करावे असे म्हणत त्यांना योग्य असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतो. हे पक्षी कायम फळांचा आस्वाद घेतात कारण ते योग्य तेवढेच घेतात आणि सगळे एकदम खायचा प्रयत्न करीत नाहीत.

आता आपण अजगराच्या खाण्याचा विचार करू. एका वेळेस जो प्राणी समोर येईल तो हळू हळू चावून न खाता तो पूर्ण प्राणी घाई घाईत गिळून टाकतो. आणि मग एकाच जागी सुस्त होऊन पडून राहतो. या सुस्तावलेल्या काळातच त्याच्यावर एखादा दुसरा प्राणी हल्ला करतो आणि हा प्रतिकार न करताच बळी पडतो.

मित्रांनो अगदी तसेच आपण जर क्लाएन्टच्या घाई मुळे किंवा इतर काही कारणामुळे  पूर्ण प्रोजेक्ट एकाच वेळेस करायला गेलो तर आपण तो शेवटी घाई गडबडीत पूर्ण करतो. यामुळे होते काय कि झालेल्या चुका पुढे आपण काही दिवस निस्तरत बसतो आणि क्लाएन्टच्या किंवा इतरांच्या आरोपांचे बळी ठरतो. प्रोजेक्ट एक तर आपल्या हातून जाते नाहीतर कंपनीच्या. त्यामुळे आपण थोडे थोडे खाल्ले पाहिजे. प्रोजेक्टच्या प्रत्येक पायरीचा विचार करायला हवा, उपलब्ध टीमच्या कौशल्यांचा विचार करायला हवा, उपलब्ध आर्थिक स्रोतांचा विचार करायला हवा आणि मग प्रोजेक्टची नीट आखणी / मांडणी करून तू सुरु करायला हवा. यात आधी थोडा वेळ जाईल पण योग्य आखणी आणि प्रत्येक पायरी पूर्ण झाल्यावर क्लाएंट बरोबर शेअर केल्यास सगळेच आनंदी राहतील. यात मुख्य गोष्ट आहे ती म्हणजे दार काही दिवसांनी या आराखड्याचा रिव्ह्यू. 

Project Management: Part-01: Introduction



मित्रांनो, नमस्कार!
प्रोजेक्ट प्लँनिंग (Project Planning) म्हणजे खरंतर एक सोपी गोष्ट. हो खरंच सोप्प आहे. तुम्ही अनेकदा वॉटरफ़ॉल मॉडेल (waterfall ), कायझन (kaizen ), अजाईल (agile), इत्यादी शब्द ऐकले असतील. त्यातूनच या सर्व प्रकारचे सर्टिफिकेशन आणि त्यांची क्लिष्टता, त्यासाठीचे मापदंड, मोठाल्या फीज हे ऐकलं असेल किंवा अनुभवलं असेल. हो खरंच हे सर्व अवघड आहे. पण मग मी सोपं का म्हणतोय? कारण शेवटी या सगळ्या मधल्या थिअरीज आपल्याला आपल्याच कामात वापरायच्या आहेत. आपलं काम जर आपल्याला नीट येत असेल म्हणजे आपल्या प्रत्येकाला बरं का. तर आपल्या टीमला जर आपापलं काम नीट येत असेल तर या सर्व थिअरीज एकदम सोप्प्या आहेत. म्हणजे प्रोजेक्ट प्लँनिंग एकदम सोप्प आहे. अजूनही अवघड वाटत आहे?
चला आपण हे मिळून सोप्प करूया. आपण काही आपल्याला उपयुक्त अशा गोष्टी सिरीज मध्ये करणार आहोत. एकदम नाही हं. कारण प्लँनिंग मधल्या अनेक संकल्पना मिळून एक हत्ती आहे. आता खराखुरा हत्ती कोणी अक्खा मुठीत घेऊ शकेल का? नाही ना ? आपणही तसेच या हत्तीच्या कधी सोंडेला स्पर्श करू तर कधी कानाला. असे करत आपण हा संपूर्ण हत्ती जाणून घेणार आहोत. जेवढे जाणून घेऊ तेवढे थोडेच.



Hello Friends,
Project planning is a simple thing! What? Do you think it's not? It's truly easy. Why am I saying so?

You must have heard about the waterfall model, kaizen, agile, etc. You must have also heard about PMP, Agile, etc project management certifications along with their measurement systems, fees for courses or certifications, credit systems. Or you have experienced it? hmm! then project management or planning is really difficult.

Then why I am saying it's easy? Am.. because all these are theories/practices/processes, we will be using in our work which we are doing regularly. If we know our work exactly ("we" mean the team) then these theories are easy.

Let's make it easy together. We will be doing some useful things in this series...no no not only one.. we will do many things. Why? because many concepts together become a huge elephant. So, can you grab an elephant by your hand? definitely no. We will touch its different body parts one by one.
So let's start...

Sunday, April 14, 2019

ओळख




“सचिन, अरे उद्याची तयारी कुठपर्यंत आली?”
“हो भाऊ झालीच”
“हं. बरं तू आणि बाकीची पोरं जेवलात न
पोटभर?”
“हो भाऊ जेवलो आम्ही”
“बरं मग. उद्या सकाळी लवकर कामाला लागा.
जे लोक बाहेर गावाहून येणार आहेत त्यांच्या चहा नाष्ट्याची सोय, जेवणाची सोय नीट करा. लोक चार वाजल्यापासून यायला लागतील, त्यांना पाणी वगैरे द्या. आपले लोक वेगवेगळ्या ठिकाणी मदतीला असुदेत. आणि काही लागल तर मला डायरेक्ट फोन कर. मी सहा वाजेपर्यंत येईन तोपर्यंत मैदान पूर्ण भरण्याची जबाबदारी तुझी. या सभेचा तू प्रमुख आहेस. चल ठेवतो आता. गुड नाईट!”

“गुड नाईट भाऊ!”


त्याने घड्याळात पाहिलं रात्रीचे अडीच वाजले होते. एवढ्या रात्री भाउंनी स्वतः आपल्याला फोन केला या जाणिवेनेच त्याची छाती अभिमानाने फुलली.
आपल्याला एक “नवी ओळख” मिळाली आहे असं त्याला वाटलं.

“चला रे आता झोपूया”, असं म्हणून तो स्वतःही स्टेजवरच्या एका कोपऱ्यात पहुडला.

सकाळी सहा वाजताच तो उठला. बाकीच्यांनाही उठवलं. जवळच्याच एका टपरीवर जाऊन सगळ्यांनी चहा घेतला. स्टेजच काम तसं होतच आल होतं. फुलांच्या माळांनी आता स्टेज सजवायचे होतं, बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांच्या चहा-नाष्ट्याची सोय बघायची होती, स्टेजवरच्या मान्यवरांचे यथासांग स्वागत करण्यासाठी वेगवेगळ्या माणसांना नेमायचे होते, त्यानंतर दुपारच्या जेवणाची सोय बघायची होती…

तो सगळं मन लावून करत होता. भाऊंनी या सभेची पूर्ण जबाबदारी आपल्यावर दिली आहे. आपणच या सभेचे प्रमुख नियोजक आहोत, असं भाऊ म्हणाले आहेत. म्हणूनच तर रात्री एवढ्या उशिरा भाऊंनी स्वतः आपल्याला फोन केला. आपल्यावर एवढी मोठी जबाबदारी भाऊंनी दिली आहे तर आपण ती व्यवस्थित पार पाडली पाहिजे आणि भाऊंचा विश्वास सार्थ ठरवला पाहिजे.

सतत वाजणारा फोन, येणाऱ्या लोकांचं स्वागत, त्यांची उठबस करता करता दिवस कसा संपला आणि संध्याकाळ कधी झाली हे त्याला कळलच नाही. आजची निवडणुकीची ही शेवटची सभा होती. परवा मतदान होते आणि त्यामुळेच या सभेला विशेष महत्त्व होते. स्टेज छान सजले होते. हवी तशी गर्दी जमली होती. मैदान पूर्ण भरले होते. आलेले मान्यवर वक्ते त्यांची त्यांची भाषणे करत होते. सगळ्यांना आतुरता होती ती भाऊंची.

साडेसहा झाले आणि भाऊ आले. भाऊंसाठी त्याने खास ढोल पथक बोलावले होते. भाऊ आल्या आल्या पथकाने वाजवायला सुरुवात केली. गर्दीतून त्याच्याच माणसांनी आधी आणि मग गर्दीने भाऊंच्या नावाचा जयघोष केला. भाऊ जिंकणार याची खात्रीच जमलेली गर्दी देत होती. भाऊंनी गर्दी पाहून सचिनच्या पाठीवर थाप मारली “भले शाब्बास! छान गर्दी जमली आहे” अस ते सचिनला म्हणाले. सचिनला ते पूर्ण मैदानच आपल्या  मुठीत आल्यासारखे वाटले. थोड्यावेळाने भाऊ भाषणाला उभे राहिले. साधारण तास-दीड तास त्यांचे भाषण चालू होतं. भाषण झालं तसं सर्व मान्यवरांनी भाऊंच अभिनंदन केलं. भाऊ त्यांच्या गाडीकडे निघाले. सचिन त्यांना भेटायला गेला आणि भाऊंच्या अंगरक्षकांनी त्याला बाजूला केलं. भाऊ हसले. गाडीत बसले. सगळ्यांना हात केला आणि निघून गेले.

थोड्याच वेळात संपूर्ण मैदान रिकामे झाले. आता सचिन आणि त्याच्याबरोबरचे कार्यकर्ते, मांडव वाले एवढेच काय ते तिथे राहिले. सभा तर यशस्वी झाली होती म्हणून भाऊंशी बोलावं आणि त्यांना शुभेच्छा द्याव्या यासाठी त्यांन भाऊंना फोन केला. रिंग वाजत राहिली पण कोणीही फोन उचलला नाही. भाऊ कामात असतील म्हणून त्याने फोन ठेवून दिला. सगळी आवराआवर झाली आणि त्याचबरोबर ते सर्व भुकेने कासावीस झाले. रोज “जेवलात का?” म्हणून फोन करणाऱ्या भाऊंचा आज फोन आला नाही. ज्या हॉटेलात सोय केली होती तिथे गेल्यावर कळाले जेवणाची सोय कालपर्यंत होती. शेवटी तो आणि बाकीचे कार्यकर्ते एका वडापावच्या गाडीवर गेले आणि तिथे वडापाव खात होते.

पुन्हा एकदा भाऊंना फोन लावून बघावं म्हणून त्याने फोन लावला.
फोन उचलला गेला. भाऊंचा असिस्टंट बोलत होता,
“काय रे एवढ्या रात्री कशाला फोन केलास?” 
“अंं... ते.., भाऊंशी बोलायचं होतं.”
“ही काय वेळ आहे का भाऊंशी बोलायची? भाऊ झोपलेत. उद्या फोन कर. चल ठेव आता.”
फोन कट झाला होता.

त्याला लक्षात आलं होतं आपलं काम झालंय. भाऊ पुन्हा पाच वर्षांसाठी झोपलेत. आपण पुन्हा एकदा कार्यकर्ते आहोत. कोणीही आपल्याला आता ओळखत नाही. आपली “ओळख” प्रचाराच्या शेवटच्या क्षणीच संपली आहे.

सकाळपासून आईचा चार-पाच वेळा फोन आला होता. कामाच्या गडबडीत त्याने तो कट केला होता. त्याने आईला फोन लावला. फोन लागला आणि पलीकडून आवाज आला, “सचिन, अरे बाळा जेवलास का रे?”



(यातील प्रसंग व सर्व पात्रे काल्पनिक असून, त्यांचा कोणत्याही अस्सल भाऊ, ताई, दादा, साहेब इत्यादी लोकांशी संबंध नाही. कृपया ओढूनताणून जोडूही नये. असे प्रसंग फक्त राजकारणातच येतात असे नाही तर कुठेही प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात येत असतात.)





Saturday, April 13, 2019

सामान्य

५ वाजले होते. सुरेशची गाडी सिग्नलला आली. लाल सिग्नल होता. त्याने गाडी थांबवली. सकाळी ७ ला घर सोडलं होते त्याने. चहा आणि ४ ग्लुकोजची बिस्किटं खाऊन. त्याच्या घरापासून त्याच ऑफिस गाठायला त्याला एक-दीड तास लागायचा. ट्रॅफिकमधून वात काढत ऑफिसला पोहोचलं कि तिथून पुढे आज कुठे जायचंय हे कळायचं. मार्केटींगचा जॉब होता त्याचा. शहरातील जो भाग पिंजून काढायचाय त्याच नाव आणि तिथले वेगवेगळे पत्ते मिळाले कि पुन्हा गाडीला किक मारायची आणि निघायचं. सगळ्या पत्त्यांवर जाऊन काम झालं कि ऑफिसला एक फोन करून सांगायचं आणि डायरेक्ट घरी.

आज नेमकं लांबचा भाग मिळाला होता. शहराच्या दुसऱ्या टोकाचा. सुरेश त्याच्या कामात एकदम तरबेज होता. त्याचं आजचं काम लवकर आटोपलं होते. १० पत्त्यांपैकी २ पत्त्यांवर कुलूप होते. पण तरीही तो आज खूप थकला होता. सूर्य आज सकाळपासून आग ओकत होता. कितीही पाणी प्यायलं तरीही तहान भागल्यासारख वाटत नव्हत. रस्त्यावरची वाहनांची वर्दळ, त्यांचे होर्नचे आवाज, पोटातली भूक या सगळ्याने तो जास्तच वैतागला होता. घामाने शर्ट पूर्ण ओला झाला होता. महिना अखेरीमुळे खिशात पैसेपण नव्हते. अचानक एका आवाजाने त्याच विचारचक्र तुटलं. "बंधुंनो आणि भगिनींनो, आज संध्याकाळी ठीक ७ वाजता आपले आमदार साहेब श्री..... यांची सभा याच ठिकाणी होणार आहे....". सकाळपासून उन्हात फिरून वैतागलेल्या त्याच्या मनाचा ताबा आता रागाने घेतला. "सभा घेणार म्हणे, निवडणूक आली कि हे भेटायला येणार. चांगली नोकरी देऊ, घर देऊ, सगळ्या वस्तू स्वस्त करू म्हणणार आणि नंतर हे सगळे गायब होणार." त्याची कानशील गरम झाली, त्याला वाटलं आत्ताच सभेच्या ठिकाणी जावं आणि ....

एकदम गडगडाट झाला आणि त्याच्या अंगावर थेंब पडू लागले. पावसाचे. होय पावसाचे. उन्हाळ्यात एकदम कसा हा पाऊस? तो विचारच करत होता पण मागून हॉर्न वाजू लागले. सिग्नल हिरवा झाला होता. पण त्याला निघावे वाटत नव्हते. त्याने गाडी बाजूला घेतली. पावसाचे थेंब अंगावर झेलत तो तिथेच बाजूला उभा राहिला. पावसाचा प्रत्येक थेंब जसा सामान्य असतो जिथे पडेल तिथला होतो. त्याच स्वतः च असं काहीच विशेष नसतं. पण तरीही जर उष्ण मातीवर पडला तर एक मंद दरवळ पसरतो. तसच त्याच्याही उष्ण विचारांवर ते थेंब पडले आणि मघा जे विचार डोक्यात होते ते विरून तोहि त्या पावसाशी एकरूप झाला होता. पावसाच्या थेंबासारखा. सामान्य.